१७ फ़ेब्रुवारी २००७. पुढची अनेक वर्षं लक्षात राहील असा हा दिवस आहे. त्याला कारणंही बरीच आहेत. या दिवसानं मला खूप काही दिलं. अपेक्षाभंगाचं दु:ख, दिवसभराची हुरहूर, काही सुखद धक्के,एकटेपणाची भावना,आयुष्यात पहिल्यांदाच लेखिकेच्या स्वाक्ष्ररीसह भेट मिळालेला कथासंग्रह,काही जुन्या प्रश्नांची उत्तरं आणी दत्त म्हणून उभे राहिलेले काही नवे प्रश्न, ईगोची जाणीव... बरंच काही म्हटलं ते यासाठी.
अस्मादिकांचा २३ वा वाढदिवस. रात्रीचे १२ वाजले. यथावकाश दोन मित्रांचे समस आले. छान वाटलं. मग सेल शांतच राहिला. झोपायच्या आधी मी परत परत सेल चेक केला. चालू होता.
सकाळ उजाडली तीच मित्राच्या फ़ोन ने. मग घरच्यांचा फ़ोन. आशिर्वादपूर्ण शुभेच्छा वगॆरे. फ़ोन ठेवल्यावरही कसली तरी हुरहूर जाणवत होती. आधी वाटलं की घरच्यांची आठवण येत असेल. पण लगेचच मी युक्तीवाद केला. "हा काही पहिलाच वाढदिवस नाही घरापासून लांब साजरा केलेला." बरोबर. मग ही बेचॆनी कसली?
अचानक उलगडा झाला. कालपासून डोक्यात कुठेतरी calculations चालू होते. कुणाचा फ़ोन येइल, कोण फ़क्त समस करेल, कोण स्वत: रूमवर आवर्जुन येइल आणी कोण अगदीच ऑर्कुटवर स्क्रॅप टाकेल. आणी दिवस कलायला आला तेव्हा जाणीव झाली की गणीत साफ़ चुकलेलं आहे. मग वाईट वाटलं. रागही आला.
राग? कशाचा? गेल्या वर्षात मी ज्यांचं वाढदिवसादिवशी अभिनंदन केलं होतं त्यांच्याकडून मी फ़सला गेलोय अशी भावना झाली होती. छे ! ही तर देवाणघेवाणीची भाषा. म्हणजे वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्या या दिवशी परत मिळाव्यात हा एवढाच विचार असतो? मला स्वत:चीच लाज वाटली. मग स्वत:वर चिडचिड करण्यात दिवस गेला.
संध्याकाळी मित्र रूमवर आला आणी मग त्याने या सगळ्यामागचं कारण सांगितलं. ऑर्कुटवर मी birth date ला show to self करुन ठेवलं होतं. त्यामुळे मित्रांना वाढदिवस दिसतच नव्हता. मग मित्रांना कळणार कसं?
अरेच्च्या! असा मामला आहे होय! छान. आणी मी मात्र दिवसभर वेगवेगळे निष्कर्ष काढत बसलो होतो. (वाढदिवस असल्याने अर्थातच प्रोजेक्ट वर्क ला दांडी मारली होती.) एकदा वाटलं की आपले इतके कमी मित्र कसे? चार वर्षात फ़क्त हाताच्या बोटावर मोजण्याइतके? मग दिवसेंदिवस , महिनोनमहिने ज्यांच्याशी गप्पा मारण्यात घालवले ते कॊण? की मस्करी करता करता, नक्कल करता करता मी अनेक मित्रांना दुखावून बसलोय जे माझं साधं अभिनंदन करायलाही तयार नाहीत! काय अन काय. डोंगर पोखरून उंदीर निघाला. त्या उंदराइतकाच माझा ईगो किती क्षुद्र आणी तकलादू आहे याची जाणीव झाली. आणि तसं बघायला गेलं तर माझ्या बर्याच मित्रांचे वाढदिवस मला तरी कुठं लक्षात आहेत? कोणीतरी सांगतं,रिमाईंडर वाजतो म्हणून ऎटीत फ़ोन करणं आणि विश करणं चालू आहे. मग आज ज्यांना वाढदिवसाची कल्पनाच नाही आहे त्यांना मित्र न समजणं हा किती मूर्खपणा!
हायसं वाटलं. मनावरचं दडपण कमी झालं. अपराधीपणाची भावनाही जरा बोथट झाली. मग विचार केला की अरे कुणीही न सांगताही ज्या मित्रांचे फ़ोन आले त्यांची मॆत्री लाभली ही भाग्याची गोष्ट नाही का? मित्र या गोष्टीचं माझ्या आयुष्यातलं स्थान नव्यानं उमगलं. मित्रांशिवायच्या आयुष्याची झलकही बघितली. हा वाढदिवस स्वत:ला ऒळखण्यात गेला.
अर्थात सगळंच काही इतकं उदास नव्हतं काही. माझ्या एका मित्राचे आईवडिल दोघेही साहित्यिक आहेत. त्याच्या आईने त्यांनी लिहिलेला कथासंग्रह स्वत:च्या हस्ताक्षरात मला भेट दिला. खुद्द लेखिकेकडून सप्रेम भेट. मी हवेत होतो. लहानपणापासूनची ही इच्छा पूर्ण झाली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या वाढदिवसादिवशी मी ख्रर्या अर्थानं मोठा झालो. आता वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना हा व्यवहार नाही आहे याची स्वत:ला खात्री पटवेन.
१७ फ़ेब्रुवारी २००७. मी कधीच विसरणार नाही. :)
9 comments:
hey, belated happy birthday!!! :)
Vichar pramanik ahet ani changale mandale ahet.
धन्यवाद. appreciate that :D
च्यायला, कसं तुम्हाला जमतं कळत नाही असलं काही लिहायला!!! आवडला लेख!!
Naaraj kayaho honeka Bhidu?
Belated Happy birthday
Aavadya
patya
:)
man belated happy bday and ur attitude rocks!!
well written and most imp. honestly written unlike hypocrits who mail/call only bcoz reminders ring. (and some whor too absent minded to even do that e.g. me :D)
thers a saying in the corporate world - "to keep healthy relations never forget to send ur best wishes on their b'day"
but when its not only for healthy relations u'll get best wishes all the time....
अरेच्चा ब-याच दिवसानी आले इकडे
अगदी प्रामाणीक विचार
लिखते रहो
वाढदिवसाच्या उशीरानी शुभेच्छा रे तुला :)
Post a Comment